Tuesday, July 9, 2013

Karwar -Beauty of nature


अचानक एक दिवस भावोजींचा फोन आला, म्हणाले की शैला म्हणते तू काहीतरी लिहावं, आपल्या कारवार विषयी. 

त्या क्षणापासून मी कारवार बद्दल विचार करत राहिली. बाल कवीच्या कवितेतल्या ओळी माझ्या मनात रुंजी घालत होते.

"  ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर"

आपल गाव म्हटलं की आजही माझे मन वाऱ्याच्या गतीने जावून कारवारला विसावते.
ज्या कारवार मध्ये माझे पुरा बालपण शिक्षण होईतोपर्यंत गेले. तेंव्हा जेवढी आपुलकी नव्हती अस नव्हे जाणीव नव्हती मला. आज प्रत्येक आठवणी मध्ये मी दंग होवून जाते.

आपल कारवार काही पर्यटनस्थळां पैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ , जिथे  आपल्या ग्रामीणपणाबरोबर सुसंस्कृतपणाही छानच जपलाय. या अनोख्या गावाला निसर्गाची साथ आहेच , जोडीला अफाट निळयासार अरबी समुद्राची गाज, समुद्रामध्ये देवगड, मडलिंग गड, आणि कुरुम गड जिथे दरवर्षी नरसिंह देवाची विशेष जत्रा भरते. नयनरम्य निसर्ग बहाल करताना विधात्याने कुठेच हात आखडता घेतलेला नाही ह्याच मला अप्रूप  वाटते.  महत्त्वाचं बंदर अशी ओळख असलेलं कारवार ‘काळी’ नदीच्या मुखापाशी वसलं आहे. संथ वाहणाऱ्या काळी नदीची चमचम करणाऱ्या सूर्याच्या  किरने व त्यामध्ये दिसणाऱ्या सोनेरी व  चंदेरी लाटा आणि अफाट अरबी समुद्राच्या फेसाळ लेल्या लाटा ज्या मध्ये सगळेच हरखून जातात.  समुद्र आणि नदीच्या संगमावर्ती जो पूल आहे तो तर मला नेहमी लंकेच्या सेतू सारखा वाटत असतो. ज्याच्यावर उभे राहून माझ्यासारखे कित्येकजण  क्षितीज्याच्या त्या पलीकडे अस्तःला जाणारा सूर्य डोळ्यात साठवतात. तिथूनच खाली माझ्या मामाच गाव तारीवाडा वसलेलं आहे काळी नदीच्या तीरावर.घराच्या अंगणातून उगवता सूर्याला न्याहाळणे व सखल वाडा वरच्या रेतीच्या ढिगाऱ्या वर बसून मावळतीचा सूर्य पाहणे हा तर माझा बालपणीचा छंदच बनला होता जणू. 

इथल्या सदाशिव गडावर सावरपै वरती ऐतिहासिक कोठा-खली आहे, वर गडावर किल्ला आहे, जिथे आजही ऐतिहासिक तोफा आपण पाहू शकतो. गडावर आपल्या भंडारी लोकांच सुंदर मनोहारी दुर्गा माता मंदिर आहे जिथे दशहरा उत्सव मोठ्या पारंपारिक पद्धतीने व धुमधडाक्यात साजरा केला जातो. , जिथले पायऱ्या चढ उतार करणे आम्हा मैत्रिणीचा शाळेतून येतानाचा रोजचा आणि एक छंद. जवळचा ‘पीरशहा शमसुद्दिन खारोबात’चा दर्गा व तिथला उरूस, आणि महामाया मंदिर चा प्रसिद्ध तेर, मनाच्या आठवणीत नेहमी असतात. 

माझ्या सासरच नागनाथ मंदिर जे नंदनगदडला काळ्या नदीच्या काठावर आहे जिथे हि कित्येक पर्यटक नेहमी भेट देतात. दिवसभरात निसर्गाची वेगवेगळी रूपं दाखवणा-या कारवार शहराची चौपाटी म्हणजे ‘रवीन्द्रनाथ टागोर बीच’. याखेरीज बेलेकिरी, अंकोला, गुरुचारीत्रातल पवित्र स्थान गोकर्ण- महाबळेश्वर, तिथल ओम बीच हे कारवारी किनाऱ्यांचे वैभव अधिकच देखणे करतात. सागराची निळाई आणि दुर्मीळ पांढरी शुभ्र वाळू हे या चौपाटीचं वैशिष्टय़ आहेच तर तील माती वरची काळे तिळा सारखी माती हे एक बघण्यासारखे वैशिष्ठ.कारवार जवळच्या ‘बेतकोल’ या धक्क्यावर बारमाही मासेमारी चालते. बांगडा’मासा म्हटला आणि कारवारच नाव आठवत नाही असा कारवारी माणूस दुजाच.कारवारच्या समुद्रातील ‘बांगडा’ आणि तर्ली त्याच ‘हुमण’ (कालवण) जेवणात मिळाल्यावर मत्स्यप्रेमीना जो आनंद तो विरळाच. 

निसर्गप्रेमी बेंगाली कवि रवींद्रनाथ टागोर हे तर कारवारच्या सागरकिनाऱ्याच्या प्रेमातच पडले.कारवार ला १८८२ त्याच्या वयाच्या २२ व्या वर्षी भेट दिली होतीत्यांचे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे  ब्रिटिश आमदानीत कारवारला बडे सरकारी अंमलदार होते. तेव्हा रवीन्द्रनाथांचं कारवारला नेहमीच येणं होई. या किनाऱ्याबद्दल गुरुदेव म्हणतात,
कारवारचा समुद्रकिनारा ही खरोखरच अशी उत्तम जागा आहे की, या ठिकाणी आपल्याला जाणीव होते की निसर्गाचे सौंदर्य हे एखादे काल्पनिक मृगजळ नाही तर ते अनंत्वाचा आनंद प्रतिबिंबित करणारे आहे आणि त्यायोगे आपल्याला त्यात हरवून जायला लावणारे आहे.’’ या सागर किना-याला कविवर्य रवींद्रनाथ टागोरांचे नाव देऊन मोठे औचित्य साधले गेले आहे. 

कारवार नजीकच्या विलोभनीय ‘देवबाग’जिथले नरसिंह देव् स्थान ,व डौलदार सुरीच्या झाडातली धुंद -बेधुंध सलसलती हवा,तिथला निळाशार समुद्र सफेद वाळूचा किनारा चालत अनुभवणे. मध्येच काळ्या नदीच छोठ छोठ नैसर्गिक बहारदार अस्तित्व दाखवणे मनाच्या आठवणीत सदा असतात.  बस ने किंवा तिकडे पोहोचण्यासाठी समुद्रातूनच 10 मिनिटांचा लाँचप्रवास करून  निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटक इथे जातात, ते ठिकाण त्यांना खचितच आवडते. वनपर्यटनाचा सुखद अनुभव देणारी ‘लॉगहट’ निवास व्यवस्थेसह स्वयंपूर्ण सुसज्ज निवासव्यवस्था येथे उपलब्ध आहे. त्याशिवाय सागरी नौकानयन, जलक्रीडा आणि जंगल सहवासातील पदभ्रणाला (ट्रेकिंग) येथे खूपच वाव आहे.

कारवारला नैसर्गिक पार्श्वभूमीबरोबर धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासकाळात कारवार ही एक प्रमुख व्यापारी पेठ आणि विजापूर प्रशासनाच्या अधिपत्त्याखालील देसायांचं ठाणं होतं. बंदराचं महत्त्व जाणून सन 1638 मध्ये इंग्रजांनी व्यापार वृद्धीसाठी कारवार मुक्कामी वखार थाटली. इथून मसाल्याचे पदार्थ आणि कापडाची निर्यात  होत असे. पोतुगीज आणि डचांनीसुद्धा कारवारहून व्यापाराला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा कारवारवर स्वारी करून स्वराज्यविस्ताराचा प्रयत्न केला. सन 1715 मध्ये सोंडेकर संस्थानिकांनी जुना किल्ला पाडून आजचा ‘सदाशिव गड’ उभारला. मुंबई - कोचीन दरम्यानचं एक सुरक्षित बंदर म्हणून कारवारचं महत्त्व पहिल्यापासून आहेच.कारवारवर कोकण - गोवा यांच्याप्रमाणे मराठी छाप आहेच. अनेक मराठीभाषक कुटुंबांची देवस्थानं आणि श्रद्धास्थान असलेली येथील बरीच मंदिरं जुन्या शैलीची असून त्यातून पुरातन शिल्पकला आणि जीवनशैली जाणवते. कारवारजवळील महासती मंदिर (मस्ती कट्टा) आणि संकेरीच्या कृष्ण मंदिरांतून प्राचीन शैलीचे आविष्कार पाहायला मिळतात. सर्व थरातील पर्यटकांना परवडणारी खासगी हॉटेल निवासव्यवस्था कारवारला आहे. तसेच येथील कोकणी पद्धतीचे शाकाहारी - मांसाहारी भोजन सर्वाना समाधान देणारे आहे. एकांतप्रिय - निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी कारवार परिसर परिपूर्ण आहे. पर्यटनाला आमंत्रण देऊन कारवारचा परिसर नेहमीच आपलं स्वागत करते.

पूर्वीच्या काळी रस्त्यांची अवस्था अंत्यत बिकट होती. अनेक रस्ते कच्चे होते. एसटीचा प्रसार फारसा झालेला नव्हता. दळणवळण हे बरेचसे बैलगाडीने तर काही ठिकाणी पायी मैलोन मैल चालत जावे लागत असे.  आज सर्व गावे रस्त्याने जोडली गेलेली आहेत. सर्वत्र एसटीचा संचार आहे. जोडीला खासगी वाहने, रेल्वे ह्यामुळे प्रवास  सोपा झाला आहे. पूर्वी स्वत:च्या मालकीची सायकल असणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. काळाच्या ओघात सायकल बंद झाली असून, तिची जागा आता मोटारसायकल व काही ठिकाणी चारचाकी वाहनांनी घेतली आहे. अनेकांकडे स्वत:ची वाहने आली आहेत.  

पूर्वीच्या काळी दळणवळणाची समस्या असताना आपले कितीतरी पूर्वज बांधव मुंबई ला किती दिवसाचा नव्हे तर किती महिन्याचा चालत प्रवास करून मुंबईला कामासाठी आले होते. त्यातच एक माझे चुलत आजोबा काशिनाथ कलगुटकर. त्यातल्याच काही जणांनी रोजच्या जगण्याच्या धावपळीत कारवार जिल्हा भंडारी संघाची स्थापना केली होती. ज्याचा आजच्या आपल्या पिढीमध्ये वटवृक्ष झालाय. कित्येकांच्यी मेहनत, कष्ठ  , प्रयत्न ह्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत. जे  आपल्या रोजच्या धावपळीत आपल्या समाजासाठी झटतात. त्यांना आपणहि साथ ध्यायला पाहिजे. 

काही काही माणसे  नुसते  विचारतात ह्या कारवारी भंडारी समाज संघाने  समाजासाठी काय केले? असं हे जे विचारतात त्यांना ह्या संघाकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः हि तो एक माणूस म्हणून कसा झटतो किंवा कसा झटला असता संघासाठी. संघ म्हणजे कोणा एकाचा नाही आहे, तो आपल्या सर्वांचा आहे, त्याला मोठ करणा आपल्या सर्वांच एक कर्तव्य आहे, जबाबदारी आहे , पुढच्या पिढी  साठी त्याचा विस्तार करणे जरुरी आहे.  नाही ना? एक वास्तू उभी राहिली नाही आपल्या समाज्याची ह्यांची खंत सगळ्यांना आहे पण .........................पुढे कितीतरी पण ची उत्तर आपल्याकडे नाही आहेत. ज्या माणसाने संघ स्थापन केला १९४५ साली त्याकाळी अपूर शिक्षण, अपुरा पगार, जगण्याची धडपड त्यात जे स्वतः आपल्यासाठी आणि आपल्यापारीवारासाठी कमी पडत असणार तेंव्हा ते कुठून एवढा निधी जमा करून आपल्यासाठी आरामात वास्तू उभे करणार. ही आपली  अपेकश्या फोल आहे. आपण १९४५ पेक्ष्या आज २०१० साली खूप काही पुढे आहोत . मी जेव्हा १९९० साली मुंबईला प्रथम आली तेंव्हा आपला संघ आहे हेही मला माहित नव्हते, नंतर ब-रयाच कार्य कर्त्याने मेहनतीने आणि जिद्दीने २००२ पासून प्रयत्न करून नव्या जोमाने, नव्या उमेदीने  दरवर्षी विविध कार्यक्रम जसे स्नेह्सम्मेलन,वधु-वर मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम,गरजवंताना मदत  सुरु केले. ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सगळ्या भंडारी बांधवाना त्याची महती समजली. आजची आपली पिढी मनात आणले तर काही करू शकते. त्यासाठी प्रत्येक भंडारी माणसाची ईश्च्या शक्ती पाहिजे. सगळ्याचे हात एकत्र एवूनच हे स्वप्न सत्यात आपण उतरवू शकतो. प्रत्येकाचा उदार दृष्टीकोन, प्रत्येकाची मदतीने आपण आपल्या समाज्यासाठी  काही करू 

आज आपण दरवर्षी संघाच्या स्नेह संमेलनामुळे भेटतो. कित्येक नव्या ओळखी होतात.किती जुनी ओळखीचे, आप्त स्नेही, मित्र , सखे, सोयरे भेटतात. आपण सगळे ह्या एका दिवसाची  वाट बघत असतो. त्यात एक धागा सम असतो तो आपण सगळे भंडारी कारवारचे आहेत.

आज आपण दरवर्षी संघाच्या स्नेह संमेलनामुळे भेटतो. कित्येक नव्या ओळखी होतात.किती जुनी ओळखीचे, आप्त स्नेही, मित्र , सखे, सोयरे भेटतात. आपण सगळे ह्या एका दिवसाची  वाट बघत असतो. त्यात एक धागा सम असतो तो आपण सगळे भंडारी कारवारचे आहेत.

सुप्रसिद्ध लेणी व शिल्पे

सुप्रसिद्ध लेणी व शिल्पे